शुक्रवार, १ मार्च, २०१३

नात्यांच्या ह्या रेशीम गाठी ...


मनासारखी अवघड गोष्ट नाही ,
नाही आपल्या ताब्यात ठेवता येत
नाही त्यास जेरबंद करता येत
नसतो त्याला कसला रंग नि गंध
नसतो कसला आकार, उकार
पण तरीही त्याच अस्तित्व असत.
आणि म्हणूनच आपल्या सभोवतालच परिसर
नेहमी सुख- दुखात बरसत असत

एखाद्याच 'मन' राखणं ते जपणं तेही आपलं स्वतःच मन सांभाळून , फारच कठीण ...असतं
कारण आयुष्यात बरे वाईट अपघात हे होतच असतात त्या त्या ठराविक वेळेस ..त्या त्या क्षणी
आणि त्या नुसार आपल्या मनाचे धागे हि बदलत राहतात ,
आणि अशा परिस्थितीत हि आपल्या सोबत इतरांचं मन संभाळण हे फारच कठीण होवून जातं ...........
काही वेळेस अशाने इतर ''मन '' हि दुखावली जातात , रुसली जातात .........आणि त्या रुसव्या मनास पुन्हा हसवण हे आपल कर्तव्यच... ते करावच लागतं ..काही वेळा ते अवघड असत , काही वेळा सोपं..

आपलं मन जरी एक असलं तरी ....नाती अनेक असल्यामुळे ...
नात्यानं सोबत त्या त्या व्यक्तीच्या मनाचा विचार करन , त्याला जपन हि भाग पडत
जीवन हे नात्यांच्या अनेक रेशमी गाठींनी बांधलेलं असत , आणि ती रेशमी गाठ जशीच्या तशी भक्कम ठेवायची असेल तर .....इतरांच्या मनाचा विचार करावाच लागतो .
नात्यन शिवाय जीवन नाही...आणि मना शिवाय माणूस नाही ..

एक व्यक्ती
अनेक नाती
नात्यांच्या ह्या
रेशीम गाठी ..........................

नातं तुझं माझं
मनातले काही

संकेत य पाटेकर
१६.०३.२०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...

सहजह 'आठवण' यावी असं काही नसतं रे 'आपलेपणचा हुंदका' तेवढा सहज निघतो रे ...! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे 'हृद...